Sunday, March 6, 2016

एन्ड्युरोचा थरार आणि वाट चुकलेला वाटसरू

खूप दिवसांनी लिहितेय,पण हे सांगायलाच हवं..पुण्यात एन्ड्युरोच्या थरारक स्पर्धेत भाग घेतला तेव्हा एक गोष्ट मनात घर करून राहिली.डोणजे गावातून आम्ही सायकलस्वार निघालो.IBN लोकमतच्या आमच्या तीन टीम मंदार फणसे सरांच्या प्रोत्साहनामुळे सहभागी झाल्या.सायकलींग,माऊन्टन बायकींग आणि ट्रेकिंग..सायकलींगची तयारी जोरदार सुरू होती पण माऊन्टन बायकींगचा अनुभव शून्य होता.त्यानंतर सिंहगड पाऊलवाटेने चढून उतरायचाही होता..पाय-यांच्या सोप्या मार्गाने नाही.तरीही तयार झालो आणि स्पर्धा पूर्ण करायचीच अशी जिद्द उराशी बाळगली.सायकली निघाल्या,आरोळ्या ठोकल्या..अमाप उत्साह आणि अफाट ऊर्जा..सुरुवात तर एक नंबर झाली.
मग चढावर चढ दिसायला लागले..हे होतं माऊन्टन बायकिंग..हा शब्द फार आकर्षक वाटतो पण सायकली उचलत एकेक टप्पा ओलांडणे आणि सायकली दामटवत चढणे हे चांगलंच दम काढणारं होतं.नंतर सुरू झाला चित्तथरारक खेळ...प्रचंड खडबडीत वाळूच्या वाटेवर खोल उतारावर सायकल चालवणे..पडलात तर कपाळमोक्ष किंवा एक फ्रॅक्चर नक्कीच.मग खरा कस लागला सायकलिंग कौशल्याचा...विचार करायला पण उसंत नव्हती..एवढा खोल उतार होता कितीतरी काळ की फक्त बॅलेन्सिंगवर भर देत पुढे जायचं होतं...असे कितीतरी किलोमीटर्स रेटले एकदाचे..खाली आल्यावर वाटलं सुटलो,संपला असावा सायकलिंगचा टप्पा पण कसलं काय नंतर एक पक्का रस्ता लागला..पिक्चर अभी इंटरवल तक भी नही आया था.टळटळीत उन्हात सायकल चालवणं सुरूच होतं.शरीरातले सगळे अवयव बोलू लागले होते पण चले चलो हा मनाचा हिय्या ठाम होता.कसेबसे पुढील 30किमी पार केले..एन्ड्युरोचे volunteers हात करताना दिसले तेव्हा कळलं पहिला टप्पा आपण पार केला.पण खरी लढाई पुढे होती.पाणी पिण्याचा ब्रेक झाला आणि पाच मिनिटांत आमची टीम पुढे निघाली.सिंहगड पाऊलवाटेने चढायला सुरुवात झाली. पुन्हा चले चलो...मग पुढील एक तास गेला..कळस अजूनही खूप लांब होता..दमण्याच्या पलिकडची अवस्था काय असते ते कळायला लागलं होतं.ही सगळी गंमत वरून सूर्यमहाशय एकटक पाहत होते.का आपण हे आव्हान स्विकारलंय,वाटेत मिडियाच्या दुस-या दोन टीम्सने कच खात स्पर्धा सोडून दिल्याचं याचि देही याचि डोळा पाहिलं होतं.ते हुशार होते,त्यांना वेळेत कळलं असेही विचार मनात येऊन गेले.आधीच आपला जीव काय,आपण करतोय काय या सगळ्या विचारांनी मनाला ग्रासलं होतं,तनाची तर विकेट गेली होती.आता चक्कर येणार आणि आपण धीर सोडणार असं वाटत असतानाच तो वाटसरू दिसला आणि डोळे खाडकन् उघडले.साधा शर्ट-पॅण्ट घातलेला एक तिशीतला माणूस अनवाणी उभा होता.शेजारी त्याचे चामड्याचे जीर्ण झालेले बूट.पाय बूट चावल्यामुळे रक्ताळलेला आणि तो क्षणभर विश्रांतीसाठी तसाच उभा.बाकी सगळे स्पर्धक सोडून हा एकटाच असा दिसला मंदार सरांनी त्याची विचारपूस केली तेव्हा कळलं हा बिचारा सिंहगड चुकून या पाऊलवाटेनं चढला.पाय-यांचा सोपा मार्ग त्याला सापडला नाही आणि तो या कठीण मार्गाने निघाला.वाटेत त्याला कळलं आपण साफ चुकलोय.तो आमच्यासारखा स्पर्धेत सहभागी नव्हता ना त्याने आमच्यासारखे सायकलचे हेल्मेट,आदिदासची ट्रॅकपॅण्ट टीशर्ट अन् स्पोर्ट शूज घातले होते.तो आपला सहज सुट्टीच्या दिवशी सिंहगड पहावा म्हणून पहिल्यांदाच आला आणि त्या खडतर वाटेने आणि चामड्याच्या बुटांनी त्याला पुरतं असहाय्य केल.त्यात आणखी एक कळलं त्याच्या पायात दोष होता पण तरीही तो खचला नाही.स्मितहास्य करत तो म्हणाला 'जायेगा,पुरा करेगा'.आणि आम्हाला त्याने स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या.कोण होता तो,का भेटला आम्हाला आणि काय उभारी देऊन गेला आम्हाला काय माहीत.त्याला पाणी दिलं आणि आम्ही पुढे निघालो.बाकी कोणतीच मदत त्याला नको होती.त्याला पाहिलं आणि स्पर्धा सोडण्याचे सगळे विचार खळ्ळकन् गळून पडले.आम्ही पुढील अर्धा टप्पा पूर्ण केला आणि परत उतरायला लागलो तेव्हाही आम्हाला तो वाटसरू दिसला.यावेळी त्याच्या चेह-यावर आनंद होता.त्याने गड सर केला तसाच अनवाणी पायांनी आणि आता तो उतरायला सुरुवात करत होता.त्याला सलाम ठोकला आणि आम्ही पुन्हा निघालो झपापझप पुढे.खाली आलो,एन्ड्युरेच्या टीमने जोरदार स्वागत केलं.आमची मित्रमंडळीही आमचं कौतुक करत होती.आमच्यासारख्या beginnersसाठी हा खरंच अत्यंत आनंददायी क्षण होता.आम्ही पहिल्या तीनात बाजी मारली.मेडल मिळालं.सगळं हवं तसं झालं पण लक्षात राहिला तो वाट चुकलेला वाटसरू आणि त्याचा हसरा चेहरा.

Wednesday, April 1, 2015


तू ट्विटरवर आहेस का?
तू व्हाॅट्सअप वर आहेस का?
तू इन्स्टाग्रामवर आहेस का?
फेसबुकवर तर असशीलच ना?
असं लोक आजकाल विचारत असतात,
व्हर्च्युअल जगात मीदेखील चिवचिवाट टिवटिवाट करत असतेच..
कधी कामासाठी म्हणून..
कधी जगाला काहीतरी ओरडून सांगायचं म्हणून..
तर कधी गालिब गुलजार कैफ
वेड लावतात म्हणून...
तर कधी मनातलं काही सांगावसं वाटतं म्हणून...
पण या सगळ्यात महत्वाचा असतो तो निखळ आणि उन्मुक्त संवाद..
तू ट्विटर फेसबुक इन्स्टाग्राम या कुठेही आहेस की नाही हे महत्वाचं नाहीए,
तू माझ्याशी बोलणार आहेस का?
तू माझ्याशी बोलणं ही माझी भूक आहे तशी ती तुझीही आहे का?
हे आणि हेच महत्वाचं ठरतं शेवटी..
संवाद हरवायचा नाही
संवाद साधायचा,
संवाद जगायचा,
संवादून जायचं..
जिथे असू तिथे...तेव्हा
मग आयुष्य सुंदर आहेच,
व्हर्च्युअल नाही,
खरंखुरं ताजंतवानं,
मनमोकळं आयुष्य...

देशील ना मला साथ..या संवादात?
- नीलिमा

Tuesday, December 17, 2013

शब्द अपुरे पडतात तेव्हा…

सगळंच 140 अक्षरांमध्ये कसं सांगणार ट्विटर राव…
ते घाव इतक्या तुटपुंज्या शब्दांत मावणार नाहीत आताशा..
ते घाव त्या निर्भयावर होते…
ते घाव त्या नकोशीवर होते…
ते घाव त्या दामिनीवर होते…
हरयाणातल्या त्या कुमारिकेवर होते…
तर खैरलांजीतल्या प्रियांकावरही केलेले ते निर्घृण घाव होते…
बलात्काराला जात नसते, पण स्त्री ही एकमेव जात उरतेच ना तरीही…
पृथ्वीच्या अंतापर्यंत तरी !
माणुसकी हा चार अक्षरांचा शब्द डिलीट होत चाललाय ट्विटर राव…
तू एकशेचाळीस अक्षरांचं काय घेऊन बसलास?

त्या दामिनी… त्या रागिणी शब्दांनी वार तर करत होत्या
पण अपुरे पडले ते शब्द राक्षसी वासनेपुढे…

एकशेचाळीस अक्षरं लांब राहिली रे ट्विटर राव…
एक हुंदका…
तो कसा पोस्ट करू सांग फक्त…

Monday, December 9, 2013

मरण पाहून आल्यावर...

मरण पाहून आल्यावर जगण्यावरचा 

विश्वास उडतो की दृढ होत जातो ?


उसवलेल्या धाग्यांची गुंतागुंत वाढते की तुटलेपणाची जाणीव आणखीनच विषण्ण करते ?

मरणाच्या दारात विसावलेले बंद डोळे उघडणार नसतात कधीच,

तेव्हा आठवतो त्या डोळ्यातला ओलावा आणि त्या डोळ्यांनी आपल्याला 
कधी काळी दिलेला विसावा …. 

मरण भयानक असतं की अधिकच शांत ?

ती शांतता भयावून सोडते म्हणूनच मरण पाहणं कठीण जातं का ?

मरण पाहण्याच्या वेदना आणखीनच मरणांतिक … 
मेलेला मात्र शांत आणि स्तब्ध !

मरण पाहून आल्यावर जगणं अधिक अवघड असतं की  नको इतकं सोपं ?

प्रश्नांची ही गुंतागुंत मेल्याशिवाय काही सुटणार नाही हेच अंतिम सत्य !!!

-Neelima Kulkarni

Sunday, May 19, 2013

Nivadnukiche Zolbacchan


जबरदस्त ड्रामाबाजी असलेल्या नाटकालाही लाजवेल अशी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची निवडणूक.सगळे उभे आहेत’ म्हणत नाट्यमय घटनांचा रोज नवा अंक इथे पाहायला मिळाला.

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे रोजच मानापमानाचा प्रयोग रंगला आणि नाट्यक्षेत्रात आम्ही सख्खे शेजारी’ म्हणवणारे झोलबच्चन’ एकमेकांनाच बेचकी’ मारू लागले.पोस्टाने मतपत्रिका पाठवणे त्याही हस्ते-परहस्ते, ही निवडणूक प्रक्रिया मुळातच सदोष.त्यात खोट्या मतपत्रिका छापल्या गेल्या.तब्बल 1999 मतपत्रिका बनावट आढळल्याने मुंबई विभागाची निवडणूकच रद्द करण्यात आली.

घरपोच मतपत्रिका पाठवल्या असतानाही अनेकांना त्या मिळाल्याच नाहीत.खोट्या मतपत्रिका मतमोजणीदरम्यान दिसल्या आणि 
बे दुणे पाचचा धक्कादायक हिशोब पुढे आला, तेव्हा या निवडणूक नाट्याने अक्षरशक्लायमॅक्स गाठला.
विच्छा माझी पुरी करा’ म्हणत सर्व उमेदवारांनी कंबर कसली होतीच, मात्र त्यांची नजर होती मराठी नाटकांसाठी जाहीर झालेल्या पाच कोटींच्या अनुदानावर!

त्यातच वर्षातून एकदा भरणारं नाट्यसंमेलनही राजाश्रयाशिवाय होत नाही.राजकीय स्वागताध्यक्षाशिवाय संमेलनाची नांदी सुरु होत नाही.तरीही राजकारण्यांनाही लाजवेल अशीचेहराफेरी’ नाट्यपरिषद निवडणुकांमध्ये दिसली.एकमेकांवर कुरघोड्या करणारे नाट्यवर्तुळातलेबहुरुपी रोजच मुखवटे बदलताना दिसले.
एक वेळ गिधाडे बरी पण ही कलावंत मंडळी त्याहीपेक्षा पुढे गेली.सरकारी पैशांवर डोळा ठेवून खुर्चीसाठी वाट्टेल ते करताना त्यांनी सौजन्याची ऐशी तैशी’ तर केलीच पण निवडणुकीचेही धिंडवडे काढले.

सत्वहीन मंडळी अधिकच निसत्व उद्योग करू लागली. तो मी नव्हेच म्हणत सत्तेसाठी इथे अक्षरश: आंधळ्यांची शाळा’ भरली.नटराज पॅनेल आणि उस्फूर्त पॅनेल यांनी एकमेकांवर केलेले आरोप पाहून संशयकल्लोळ अधिकच बळावला.

रंगभूमीचे हे घाशीराम’ रंगभूमी सोडून इतर मोहांना बळी पडले की काय अशी शंका वाटू लागली आहे.स्वत:ला नटसम्राट’ म्हणवणा-या या कलावंतांनी कला सोडून बाकीच्या गोष्टींना दिलेलं असाधारण महत्व पाहता आता त्यांनी घरी बसावं हेच उत्तम.कारण सुखान्त’ हवा असेल तर कलेचं वस्त्रहरण’ आता पुरे झालं.अखेर नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी नवा गडी नवं राज्य’ पाहायला मिळेल अशी आशा होती, मात्र या खुर्चीलोलूप धटिंगणांमुळे रंगभूमीचा सूर्यास्त पाहावा लागू नये हीच रंगदेवतेचरणी प्रार्थना!!!


 21 February 2013

Wednesday, April 24, 2013




Paaus Pahtana aatlya aat kahitari halate...




Khidkichya Kachewar Ashru Oghalat Rahtat...


Ani Dole Korde Thakka Houn Baghat Rahtat Bahercha Paaus...




Aaj Akashala Jamlay Kosalayla,


Aplyakade Tyacha dekhil Dushkaal...




Maati cha Gandh Manat darwalat Rahto...


Tevdhich Ek Oli Jakham Sukhawate....




Sparsha chi Tahan Gandhawar Bhagwate!

- Neelima

Friday, July 1, 2011


Main ek hi kitaab ka hissa hoon, roj nayi kahani pasand nahi mujhe....haan,par yeh eklouti kahani hogi badi dilchasp....yeh iis kirdar ka waada raha aap se ~ Neelima