मरण पाहून आल्यावर जगण्यावरचा
विश्वास उडतो की दृढ होत जातो ?
मरणाच्या दारात विसावलेले बंद डोळे उघडणार नसतात कधीच,
तेव्हा आठवतो त्या डोळ्यातला ओलावा आणि त्या डोळ्यांनी आपल्याला
कधी काळी दिलेला विसावा ….
मरण भयानक असतं की अधिकच शांत ?
ती शांतता भयावून सोडते म्हणूनच मरण पाहणं कठीण जातं का ?
मरण पाहण्याच्या वेदना आणखीनच मरणांतिक …
मेलेला मात्र शांत आणि स्तब्ध !
मरण पाहून आल्यावर जगणं अधिक अवघड असतं की नको इतकं सोपं ?
प्रश्नांची ही गुंतागुंत मेल्याशिवाय काही सुटणार नाही हेच अंतिम सत्य !!!
-Neelima Kulkarni
2 comments:
हे वाचून वाटलं, मरण हे उत्तर आहे की प्रश्न ?
कविता छान आहे नीलिमा.
सुंदर आहे कविता!
Post a Comment