Saturday, December 5, 2009

नको लागू जीवा सदा मतलबापाठी...

Thursday, December 3, 2009

Give a man a "mask"...and he will tell u the truth!!

S's secrets

writers r products of environment- says Shobha De..so true! a high class lady cant write abt vidarbha farmer,she will write abt her

Tuesday, December 1, 2009

आताशा...

आताशा घुसमट सुरू झालेय तर..आताशा श्वासाची किंमत कळू लागलेय..अजून जगणं बाकीच आहे!


Wednesday, July 1, 2009

सी लिंक..गेट सेट गो


‘अजि म्या ब्रह्म पाहिले…’या ओळी म्हणताना जितकं काही विस्मय,कौतुक,कुतुहल, या सर्व संमिश्र भावना यांचा कोलाज चेह-यावर रेखाटला जातो ते सर्व काही मी अनुभवलं..खरंच! आज प्रत्येक मुंबईकराची छाती अभिमानानं भरून येईल असा रत्नहार खरोखरच अस्तित्वात आलाय वांद्रे ते वरळी सी लिंकच्या रुपात.

वेग हा मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कितीही आपत्ती आली तरी मुंबईकर कोणासाठी थांबत मात्र नाहीत.मुंबईकरांची हीच गती ओळखून तयार करण्यात आलाय तो हा सागरी सेतू. कित्येक दिवस याबाबतच्या बातम्या कानावर पडत होत्या.न्यूजचॅनलमध्येच काम करत असल्यामुळे वारंवार दिसतही होत्या.त्यामुळे उत्सुकता दिवसागणिक वाढत होती,हे नक्की.सोमवारी रात्री सी लिंकचा लेझर शो पाहिला तेव्हा तर उत्सुकता शिगेला पोहोचली.पण ‘याचि देही याचि डोळा’ पाहिल्याशिवाय समाधान काही होत नव्हतं.बुधवारी सकाळी ७ वाजता सेतू सर्वांसाठी खुला होणार हे कळताच आदल्या रात्रीपासून सुरू झालं प्लॅनिंग..सकाळी चॅनलच्या गाडीतून ऑफिसला यायचं ते सी लिंकवरूनच हा निश्चय पक्का होता.त्याचप्रमाणे मोठ्या टेचातच ड्रायव्हरला सांगितलं की ‘बांद्रा सीलिंकपर गाडी घुमाओ...’ हूरहूर वाढतच चालली होती.पावणे सात वाजता इच्छित स्थळी पोहोचताच नजरेस आला तो पोलिसांचा जोरदार बंदोबस्त, मीडियाची गर्दी (स्टार माझाच्याही कॅमे-याची त्यात भर होतीच) आणि चारचाकी वाहनांची रांगही!

आमचा ड्रायव्हर आमच्यापेक्षा उत्साही,उजव्या बाजूने वाट काढून त्याने सर्वात कोप-यात आमची गाडी उभी केली.सातचे ठोके पडले ( की नाही कुणास ठाऊक कारण घड्याळाकडे कोण पाहतंय) नजर भिरभिरत होती ती सी लिंकच्या प्रवेशाकडे..अचानक पोलिसांनी शिट्टी वाजवली...गाड्यांमधील मुंबईकरांनी आरोळी ठोकली.. आणि धूsssssssssssssम
आम्ही सी लिंकवरून जात होतो...तो नजरेत मावत नव्हता..गाडीनं वेग पकडल्यामुळे मस्त वारं वाहत होतं..आणि त्या 5 मिनिटाच्या सफरीत काय पाहू आणि काय नको असं झालं होतं.अख्खं निळंशार आकाश ठेंगणं भासू लागलं,जणू कवेत घेतल्याप्रमाणे...खाली समुद्र शहारत होता. आकाश आणि समुद्राच्या मधोमध ही सफर क्षणोक्षणी रंजक होत चालली होती.वाटायचं थांबूच नये..हा प्रवास असाच चालत राहावा.तो वेग,ती भव्यता,ते कुतुहल..सगळं काही. तद्दन शहरी असून आणि आतापर्यंत हिंदी सिनेमांमध्ये परदेशातील असे कित्येक ब्रीज पाहूनही मी हरखले. त्या भव्यतेचं विस्मय होतंच पण त्याही पलिकडे अभिमान होता तो हे भारतात अवतरलंय याचा.26 नोव्हेंबरला मुंबईचा ताज नष्ट करू पाहणा-यांना दाखवून देण्याचा की पाहा,आमच्या मुंबईत हा नवा रत्नहार अवतरलाय.मुंबई अशा संकटांनी कधीच खचणार नाहीए तर ताठ मानेने पुन्हा पुन्हा उभी राहणार आहे नव्या आव्हानांसह,नव्या चेतनेसह!
मग या नव्या राईड विथ प्राईडचा अनुभव घ्यायला सज्ज होणार ना...गेट सेट गो !!

Sunday, February 15, 2009

आग


मुंबईवरील दहशतवादी हल्ला 26/11 ही तारीख मुंबईकर कधीच विसरू शकत नाहीत.ताज,ओबेरॉय,नरीमन हाऊस ही नावं कोरली गेली इतिहासात एका भयंकर अशा दुःस्वप्नामुळे...जे दुर्दैवाने सत्य ठरलं. ताजची आग कोणीच विसरू शकत नाही.अरुण कोलटकरांची ‘आग’ ही कविता याच भयानक वास्तवाचं विदारक दर्शन घडवते.कोलटकरांनी ही कविता खूप पूर्वी लिहीली,पण ती आजच्या परिस्थितीशी देखील लागू होतेय हे आपलं दुर्भाग्य..स्वातंत्र्योत्तर काळातले एक प्रतिभावान व्यक्तिमत्व म्हणजे अरुण कोलटकर.मध्यप्रवाहाला नवे वळण देणारी त्यांची कविता मराठीच्या सीमारेषा ओलांडून वैश्र्विक स्तरावर गेली.आपल्या कवितेबद्दल त्यांनीच कधीतरी लिहून ठेवलं आहे-‘सध्या माझी कविता चाललेली आहे ती वाट सर्वसामान्य वाचकाच्या घरावरूनच जाते.पण ती तिथं थांबणार नाही.पुढं जाणाराय- कविताबिविता वाचायच्या भानगडीत सहसा न पडणा-या रसिकाच्या शोधात! ’ खरंच, पुढील कविता वाचताना हे तंतोतत पंटतंय...

ही आग ही हसरी ही दुसरी
हिचं काय करू हिला कुठं ठेऊ
ही लाऊ का घराला दाराला जगाला
ही काय रांधेल ही कुठे पसरेल
ही चूड कुठं फेकू
ही आग शिरोधार्य
ही आग हो मशाल
हिला डोक्यावर घेऊन नाच

ही आग आगाग ही होळी
धावणारं कुंपण मी पळणारा वासा ही होळी ही होळी ही होळी
मोडलेली खिडकी मी तोडलेलं दार ही होळी ही होळी ही होळी
लंगडणारी खुर्ची मी खुरडणारं टेबल ही होळी ही होळी ही होळी
उडणारं कपाट मी लुटणारी वखार ही होळी ही होळी ही होळी

बिनभुयार हे जग हे लाक्षागृह
निरुपाय निरुपाय आगीचे बंब वाळूच्या बादल्या पाण्याच्या टाक्या
तू आग मी खाक
तू आज मी रोख
तू काल तू आग तू उद्या
तू आग तू आत्ता तू मघा तू मग
तू गुल मी छडी
तू गंधक मी काडी
तू धुनी मी मुनी
तू आग तू माग तू घे
मी धूर मी धूर मी धूर
यज्ञ मीच यजमान मीच वेदी मीच पुरोहित मीच स्थंडिल मीच
आहुती मीच
ही आगच अडाणी
समरपयामि समरपयामि समरपयामि

पेटेल आयाळ आवरतं घे
भाजेल शेपूट सांभाळून ने
चल रे माझ्या सिंहा जरा नमतं घे
या जळत्या वर्तुळातून उडी मारून जा आरपार
इकडून तिकडे नि पुन्हा तिकडून इकडे
ही शून्याकार आग ही जळती मोकळीक रोजचीच आहे
ही सर्वस्वी सर्कस तुझीच आहे

राजाभाई टॉवर गेटवे ताज
मॅजेस्टिक हॉटेल
या इमारती श्वापदं कोल्हे वाघ रानडुकरं
हे जंगल घडीव हा स्पष्ट अंधार
ही गिधाडं

तू शेकोटी शेजारी आग
पांगव हे शहर ताटकळव

राजाभाई टॉवर गेटवे ताज
मॅजेस्टिक हॉटेल चर्चगेट स्टेशन
टाऊन हॉल व्ही टी रीगल इरॉस
तटस्थ स्तब्ध
जळत रहा please माझ्यासाठी
ऊब राख मला

हे शहर घाबरव
नाहीतर या बिल्डींगा मला फाडून खातील
हे शहर जैसे थे तू म्हणून नाहीतर नाहीतर

दहशत हो शहराला म्युझियमला
शेजारी अस



सहजता


सहजता


‘सहजता’... असं खरंच काही असतं?
का नुसतेच शब्दांचे खेळ
कशाचाच कशाला नाही मेळ
एका संध्याकाळी सहजतेच्या शोधात मी,
आर्त मी.. खोल मी.. डोह मी..मी.. मी नाहीच...





काचेच्या तावदानांमागचे ओळखीचे मुखवटे
वाहनांच्या धुरात उडून जाणारी माती..
एक रात्र याच विचारात तळमळत होती
एक पहाट याच विचारात खडबडून जागी झाली..
आणि सकाळ रानोमाळ भटकू लागली..
सहजता शोधूनच परत यायचं या निर्धारात !
कुठेच सापडेना, कुठे टपून बसलीय का तीही झाली भूमिगत
काहीच अंदाज लागेना


शोध सुरूच.. अविरत
त्या सकाळी एका कौलारू नाजूकशा घराच्या दारात मी..
आर्त मी.. खोल मी.. डोह मी..
मी.. मी नाहीच...
नजर बेभानपणे आसपासच्या वावराचा ठाव घेत होती..
तीही हट्टी.. किंवा थोडी माजखोर.. मिटायला तयार होईना...


एक ऊबदार तळवा हाताला लागला..
एक निरागस नजर टकमक पाहत होती..
त्या विनापाश मुखातून शब्द आले.... ..हे काये ?
ती अनोळखी नजर जीवघेणी ओळख देत होती
माझ्याजवळील कॅमेऱ्यात हा अनोखा क्षण टिपत होती..
पाहताच एक दव टपकन हातावर पडला..
त्या दवानं हळूच कानात सांगितलं..
सहजता..अशी सहजच सापडून जाते !!!